नवी दिल्ली | आपल्याच पक्षावर नाराज असलेले खासदार वरुण गांधी आता भाजपला कायमची सोडचिट्टी देणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. वरुण गांधी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे देखील बोलले जात आहे. ममता बॅनर्जी आजपासून दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यांमध्ये ममता बॅनर्जी आणि वरुण गांधी यांची भेट होणार असल्याची माहिती मिळत आहे. या भेटीमध्ये वरुण गांधी तृणमूलमध्ये प्रवेश करण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून वरुण गांधी भाजपवर नाराज आहेत. त्यांनी अनेकदा जाहीरपणे भाजपवर टीकाही केली आहे.
काही दिवसांपासून वरुण यांनी पक्षावरील आपली जाहीर नाराजी अनेकदा व्यक्त केली आहे. अनेकदा त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजप आणि थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देखील टीका केली होती. तसेच केंद्र सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयाचे देखील ते विरोध करत होते. अनेक दिवसांपासून भाजपसोबत नाराजी असल्याने ते भाजपला रामराम ठोकूण तृणमूलमध्ये प्रवेश करणार आहेत. अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
काही दिवसांपासून खासदार वरुण गांधी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या संपर्कात आहेत. आजपासून तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, वरुण गांधी त्यांची भेट घेणार असून, त्यात तृणमूलमधील प्रवेशाबाबतची चर्चा पुढे सरकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या कॅबिनेट विस्तारामध्ये स्थान न मिळाल्याने वरुण गांधी नाराज असल्याचे बोलले जात आहे.