मुंबई : मोदीजी, आमच्या मुलांच्या हक्काची लस विदेशात का पाठवली? अशी पोस्टर्स काही लोकांनी लावल्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करून त्यांना अटक केली आहे. मोदी जी हमारे बच्चों की व्हॅक्सिन विदेश क्यों भेज दिया?” अशा आशयाचे बॅनर लावल्यामुळे कारवाई करण्यात आली आहे. याच मुद्द्यावरून आता राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे,
परदेशात हक्काची लस पाठवली तर लोक प्रश्न विचारणारच. किती लोकांना भाजप सरकार अटक करणार आहे? असा सवाल करत किती लोकांचा आवाज दाबण्याची ही केंद्रसरकारची कायरता आहे, अशा शब्दात नवाब मलिक यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. संपूर्ण देश एकजूट आहे. किती लोकांना अटक करताय बघुया, असे आव्हानहीनवाब मलिक यांनी यावेळीकेंद्रातील भाजपा सरकारला दिले आहे.
मीडियाशी संवाद साधताना नवाब मलिक यांनी जोरदार टीका केली होती. दाओसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्ही लसगुरु बनल्याचे जाहीर केले होते. यूएनमधील भारतीय दुतावासाने सांगितले की, जितके लसीकरण भारतात झाले नाही त्यापेक्षा जास्त लस विदेशात पाठवण्यात आली आहे. आता केंद्रसरकार मात्र एक कोटी पाठविल्याचे सांगत आहे. तर काहीजण पाच कोटी कंपल्सरी पाठवायच्या होत्या म्हणून पाठवल्याचे बोलत आहेत. जेव्हा देशात लस उपलब्ध होत नाहीय तेव्हाच प्रश्न उपस्थित केले जात असल्याचे मलिक म्हणाले.