मुंबई | केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टिकेनानतंर घडलेल्या राजकीय घडामोडींनंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापू लागले होते. त्यातच देवेंद्र फडणवीसांनी आम्ही राणेंच्या मागे खंभीर उभे असल्याचे विधान केलेले असताना दुसरीकडे मात्र भाजपा खासदार गिरीश बापट यांनी राणेंच्या विधानाचा समाचार घेतला आहे.
राजकीय पक्षात मतभेद असतात. पण बोलताना पथ्य पाळलं पाहिजे, अशा शब्दात गिरीश बापट यांनी राणेंना घरचा आहेर दिला. भाजप नेते, खासदार गिरीश बापट यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना नारायण राणेंना घरचा आहेर दिला. राजकीय पक्षात मतभेद असतात. पण सर्वच पक्षातील नेत्यांनी बोलताना भाषण करताना काही पथ्य पाळली पाहिजेत. त्यात सर्वच पक्ष आहेत असे विधान बापट यांनी केले होते.
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री असतील, नारायण राणे असतील यांनी आपआपली मते मांडायला हरकत नाही. पण अनेक गोष्टीत अडचणी दिसतात, मग त्याचं रुपांतर नको त्या गोष्टीत होतं. हे सर्वांनी टाळलं पाहिजे. सर्वच राजकीय नेत्यांनी बोलताना पाथ्य पाळायला हवं. तसेच सामान्य जनतेला जे आवडतं ते केलं पाहिजे. जनतेत जाऊन कामं केली पाहिजेत, असा सल्लाही त्यांनी दिला.