Saturday, August 13, 2022
  • Login
Rajkiyakatta
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • राजकारण
  • जनरल
  • व्हीडीओ
  • आरोग्य
  • कृषी
  • देश विदेश
  • नौकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • राजकारण
  • जनरल
  • व्हीडीओ
  • आरोग्य
  • कृषी
  • देश विदेश
  • नौकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Rajkiyakatta
No Result
View All Result

सावरकरांचे सामाजिक समतेचे विचार लोकांपर्यंत पोहचविण्याची गरज – चंद्रकांत पाटील

राजकीय कट्टा by राजकीय कट्टा
May 29, 2021
in महाराष्ट्र
0
सावरकरांचे सामाजिक समतेचे विचार लोकांपर्यंत पोहचविण्याची गरज – चंद्रकांत पाटील
0
SHARES
21
VIEWS


स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी सामाजिक समतेसाठी प्रत्यक्ष कृती केली आणि फार मोठा विचार मांडला. त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहचविण्याची आवश्यकता आहे, असे मत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी व्यक्त केले.


स्वा. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त भाजपा, महाराष्ट्रचा शैक्षणिक संस्था प्रकोष्ठ आणि आदर्श शैक्षणिक समूह, नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सावरकर एक गौरव गाथा’, या ऑनलाईन कार्यक्रमात मा. प्रदेशाध्यक्ष बोलत होते. यावेळी स्वा. सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर, प्रकोष्ठचे संयोजक अमित कुलकर्णी, सहसंयोजक व आदर्श शैक्षणिक संस्था पनवेल या संस्थेचे प्रमुख विसपुते, सहसंयोजक भारत खराटे आणि स्वरदा फडणीस उपस्थित होते.


पाटील म्हणाले की, अंदमानच्या तुरुंगातून सुटका झाल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात स्थानबद्ध असताना स्वा. सावरकरांनी १९२४ ते १९३७ या कालावधीत सामाजिक सुधारणांसाठी ऐतिहासिक कार्य केले. त्यांनी समाजातील चुकीच्या रूढी व परंपरांवर आघात केला व सामाजिक समतेचा फार मोठा विचार मांडला. जातीभेद संपत नाही आणि स्त्री पुरुष भेद संपत नाही तोपर्यंत देशाचा विकास होणार नाही, असे मत त्यांनी मांडले. आज परिस्थिती बदलली असली तरी लोकांची मनस्थिती बदललेली नाही. त्यामुळे सामाजिक समतेबद्दलचे सावकरांचे विचार लोकांपर्यंत पोहचविण्याची आवश्यकता आहे.


ते म्हणाले की, सावरकरांनी सामाजिक समतेचा विचार मांडला आणि प्रत्यक्ष कृतीही केली. त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यात विविध जातीच्या लोकांची सहभोजने केली तसेच विठ्ठल मंदिर सर्व जातींच्या लोकांना खुले असावे म्हणून आंदोलन केले. सर्व जातीधर्माच्या लोकांना प्रवेशास परवानगी असलेले पतीत पावन मंदिर स्थापन केले.


स्वा. सावरकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आपण विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता म्हणून रत्नागिरीतील पतित पावन मंदिर ते मुंबईतील चैत्यभूमी अशी यात्रा काढण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्या काळात सावरकरांविषयी खूप वाचले. त्यांनी जी मते मांडली ती आगामी काळात खरी ठरली. त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे आपण प्रभावित झालो, अशी आठवण मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितली.

Previous Post

शिवराज नारियलवाले यांना जबर मारहाण करणार्‍या दोषींवर कठोर कारवाई करा! देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे मागणी

Next Post

आघाडी सरकारमुळेच मराठा समजावर अन्यांय झाला आहे – रावसाहेब दानवे

Next Post
आघाडी सरकारमुळेच मराठा समजावर अन्यांय झाला आहे – रावसाहेब दानवे

आघाडी सरकारमुळेच मराठा समजावर अन्यांय झाला आहे - रावसाहेब दानवे

ताज्या धडामोडी

देवेंद्र फडणवीस यांची कार्यपद्धती अजित दादा सारखी-आ.रोहित पवार यांचे गौरवोदगार

देवेंद्र फडणवीस यांची कार्यपद्धती अजित दादा सारखी-आ.रोहित पवार यांचे गौरवोदगार

by राजकीय कट्टा
August 11, 2022
0

rohit मुंबई (राजकीय कट्टा प्रतिनिधी) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस हे अजित पवार यांची कार्यशैली ही आमचे काका विधानसभेचे विरोधी पक्षनेते...

बेकायदेशीर गुंठेवारीप्रकरणी नगर अभियंत्याच्या विभागीय चौकशीचे आदेश -नागेश अक्कलकोटे

बेकायदेशीर गुंठेवारीप्रकरणी नगर अभियंत्याच्या विभागीय चौकशीचे आदेश -नागेश अक्कलकोटे

by राजकीय कट्टा
August 10, 2022
0

बार्शी (राजकीय कट्टा प्रतिनिधी) बार्शी शहरातील ग्रीन झोनमधील बेकायदेशीर गुंठेवारी प्रकरणी चौकशीत दोषी आढळलेल्या नगर अभियंता भारत विधाते यांच्या विभागीय...

नुकसानीच्या तुलनेत जाहीर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी-आमदार कैलास घाडगे पाटील

नुकसानीच्या तुलनेत जाहीर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी-आमदार कैलास घाडगे पाटील

by राजकीय कट्टा
August 10, 2022
0

उस्मानाबाद ता. 10-भाजप सरकारने शेतकऱ्यांना जाहीर केलेली रक्कम अत्यंत तुटपुंजी आहे,सत्तेवर आल्यावर शेतकऱ्यांचे हित बघणार असे सांगणाऱ्या सत्ताधाऱ्यांवर जेव्हा प्रत्यक्षात...

मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांचे बंड थंडावणार,विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला हा शब्द

मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांचे बंड थंडावणार,विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला हा शब्द

by राजकीय कट्टा
August 10, 2022
0

मुंबई (राजकीय कट्टा प्रतिनिधी) मोहोळ तालुक्याचे माजी आमदार राजन पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे हे राष्ट्रवादी पक्ष सोडणार...

आज शिंदे फडणवीस सरकारचा होणार मंत्रिमंडळ शपथविधी

आज शिंदे फडणवीस सरकारचा होणार मंत्रिमंडळ शपथविधी

by राजकीय कट्टा
August 9, 2022
0

मुंबई (राजकीय कट्टा प्रतिनिधी) शिंदे-फडणवीस सरकारचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळाचा शपथविधी आज सकाळी 11 वाजता होणार आहे. यामध्ये आपली वर्णी लागावी याकरिता...

सोलापुरातील चिंचपूरमध्ये उद्धव ठाकरेंचें यश;  सात पैकी सात सदस्य विजयी

सोलापुरातील चिंचपूरमध्ये उद्धव ठाकरेंचें यश;  सात पैकी सात सदस्य विजयी

by राजकीय कट्टा
August 5, 2022
0

सोलापुर: राज्यातली सत्ता हातून गेल्यानंतर शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाचे 7 पैकी 7 सदस्य निवडून आलेत. सोलापूरमध्ये उध्दव ठाकरे यांच्या गटाचं पहिलं खातं...

  • मुखपृष्ठ
  • राजकारण
  • जनरल
  • व्हीडीओ
  • आरोग्य
  • कृषी
  • देश विदेश
  • नौकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक

© 2021 DK Technos - Provides Technical Suppor Contact Us.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • आरोग्य
  • कृषी
  • जनरल
  • देश विदेश
  • नौकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • व्हीडीओ
  • शैक्षणिक

© 2021 DK Technos - Provides Technical Suppor Contact Us.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In