Friday, May 27, 2022
  • Login
Rajkiyakatta
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • राजकारण
  • जनरल
  • व्हीडीओ
  • आरोग्य
  • कृषी
  • देश विदेश
  • नौकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • राजकारण
  • जनरल
  • व्हीडीओ
  • आरोग्य
  • कृषी
  • देश विदेश
  • नौकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Rajkiyakatta
No Result
View All Result

संभाजीराजेंनी ठरवलं असतं तर सरकार सुद्धा पाडू शकले असते मात्र …, वाचा सविस्तर पोस्ट |

राजकीय कट्टा by राजकीय कट्टा
June 27, 2021
in राजकारण
0
संभाजीराजेंनी ठरवलं असतं तर सरकार सुद्धा पाडू शकले असते मात्र …, वाचा सविस्तर पोस्ट |
0
SHARES
1.6k
VIEWS

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्धा तापत असताना खासदार छत्रपती संभाजीराजेंनी आंदोलनाची हाक देऊन कोल्हापुरात १६ जून पासून आंदोलनाला सुरवात केली होती. आता या आंदोलनात छत्रपतींचा मावळा केर योगेश यांनी फेसबुक पोस्ट लिहून मराठा आरक्षणाच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. काय लिहिले आहे फेसबूक पोस्टमध्ये वाचा.

संभाजीराजेंनी ठरवलं असतं तर सरकार सुद्धा पाडू शकले असते. असे आमच्या राजकीय मित्राने म्हटले. आम्ही लगेच विनाविलंब उत्तर दिले. ‘संभाजीराजेंना सरकार पाडण्यात इंटरेस्ट नाही तर लोकांच्या पदरात जास्तीत जास्त गोष्टी पाडण्यात इंटरेस्ट आहे.’ राजेंची ही भूमिका मागच्या सरकार वेळी पण होती आणि ह्या सरकार वेळी सुद्धा ती कायम आहे.

पयावर थोडा विचार करत असताना मागचा इतिहास नजरेसमोरून तरळून गेला. मराठा क्रांती मूक मोर्चाचा सर्वोच्च बिंदू म्हणजे मुंबई वर चालून गेलेला लाखोंचा जनसागर. त्यावेळी भाजप चे सरकार होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासहित विरोधी पक्षातील सुद्धा मोठमोठ्या नेत्यांच्या मनात धडकी भरली होती. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेला आणि मुंबईमध्ये अथांग सागराप्रमाणे पसरलेला मराठा समाज. यापूर्वी मुंबापुरीने केवळ अरबी समुद्राच्या रौद्र लाटा पाहिल्या होत्या पण तेंव्हा मराठ्यांची सुनामी अनुभवली असे म्हटले तरी अतिशयोक्ति होणार नाही.

सरकार बोलण्या करत होते. समन्वयक लोक चर्चे साठी गेले खरे पण लोकांच्या समोर येणार कोण? सरकार मधील कोणीही नेता येऊन चालणार नव्हता. विरोधी पक्षातील मराठा नेत्यांना सुद्धा विचारणा केली गेली की लोकांपुढे जाऊन त्यांना सुखरूप घरी जाण्याची विनंती कराल का? मला इथे त्यांची नावे घ्यायची नाहीत. पण ते म्हणाले की आमच्या क्षमते पलीकडे ही गोष्ट आहे. काहींनी तर लगेच आमच्या ठरलेल्या बैठका आहेत म्हणून पळ काढला.

तेंव्हा एक नाव सर्वांना सुचले, ते म्हणजे छत्रपती संभाजीराजे. जेंव्हा विधान भवनात समन्वयक आणि सरकार ची बैठक सुरू होती तेंव्हा संभाजीराजे काय करत होते? तर गेट वर उभे राहून उशिरा येणाऱ्या समंव्यकांची आतमध्ये पाठवण्याची सोय करत होते. कारण नेमके समन्वयक कोण? हे पोलिसांना कसे कळणार? म्हणून राजे तिथे एकेकाला आत सोडण्यासाठी उभे होते. शेवटी राजेंना निरोप पाठवला गेला की आमच्या बोलण्या झाल्या आहेत. आपण सुद्धा त्या बैठकीत मार्गदर्शन करावे. मग राजे आत गेले. आणि मागे एक खुर्ची होती तिथे राजे बसले. समाजाच्या मागण्या उघड होत्या जास्त काही बोलण्याची स्थिती नव्हती.

सरकार नी मराठा समाजासाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली गेली. पण खरा पेच पुढे होता. हे सगळं जाऊन लोकांना कोण सांगणार? मग राजेंना विनंती करण्यात आली की राजे आपण स्टेज वर जाऊन लोकांना शांत सुखरूप पणे घरी जाण्याची विनंती करा. जे इतर राजकारण्यांना कळले होते ते संभाजीराजांना सुद्धा लक्षात आले होते. की आपण जर स्टेज वर गेलो, आणि आपल्या हातून एखादी जरी चूक झाली, तर आपलं राजकीय सामाजिक भवितव्य धोक्यात येऊ शकतं. राजेंनी स्पष्ट नकार दिला.

राजेंची ही भूमिका पाहून लगेच, मुंबई पोलीस चे अत्यंत वरिष्ठ असलेल्या अधिकारी साहेबांनी राजेंना विनंती केली. की महाराज आपण जर आज त्या स्टेज वर नाही गेला तर अनर्थ होईल. लहान मुलं आहेत, वृद्ध स्त्रिया आणि पुरुष आहेत. काही गोंधळ झाला तर अनेकांचा बळी जाईल. मुंबई मध्ये दंगल सुद्धा उसळण्याची शक्यता आहे. काही समाज कंटक लोक तिथे असं काही व्हावं म्हणून तयार बसले आहेत. मी आपली हात जोडून विनंती करतो की कृपा करून भोळ्या भाबड्या लोकांच्या जीवसाठी आपण स्टेज वर गेलेच पाहिजे.

ही विनंती ऐकून राजेंनी थोडा वेळ विचार केला. शेवटी छत्रपतींनी संकट काळातून मार्ग काढायचा असतो. राजकीय भवितव्य धोक्यात आलं तरी चालेल पण आपण लोकांचा जीव वाचवला पाहिजे. आपल्या पेक्षा आपला समाज महत्वाचा आहे ही शिकवण शिवछत्रपतींची आहे. ही खूणगाठ बांधून राजे स्टेज वर गेले. आणि केवळ सरकार ने ज्या काही मागण्या मान्य केल्या आहेत त्या मुली सांगतील आपण केवळ शांतपणे ऐकून घ्यावे असे विनम्रतापूर्वक आवाहन केले. आश्चर्य म्हणजे संपूर्ण समाज शांत पने घरी सुखरूप गेला. छत्रपती घराण्याची ताकद होती. आणि खऱ्या अर्थाने संभाजीराजांनी समाजाप्रती केलेल्या निस्वार्थ कार्याची ही पोचपावती होती.

संभाजराजांनी त्याही वेळी भाजप सरकार ला कोंडीत पकडले नाही, संधी असताना. याही वेळेस सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मराठा आरक्षण विरोधी लागला तरी राजेंनी सामंजस्याची भूमिका घेतली. लोकांना वेठीस धरणे किंवा स्वतःचं राजकीय भवितव्य सुरक्षित करणे हे असले डाव राजेंनी कधीच खेळले नाहीत. राजेंनी उलट एकीकडे आंदोलनाची धग वाढवून दुसरीकडे सरकार सोबत चर्चेने समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य दिले. त्यावेळी सुद्धा विरोधी पक्षातल्या लोकांना हायसे वाटले होते आणि यावेळी सध्याच्या विरोधी पक्षाला अडचण वाटत आहे.

Previous Post

“आर्थिक जनगणनेची आकडेवारी दाबून ठेवणारा भाजपा ओबीसी आरक्षण प्रश्नावरून आंदोलन करतोय”

Next Post

” राजकारणातल्या लोकांना अशा पध्दतीने भीती दाखवायला लागले तर देशातील लोकशाहीच संपुष्टात येईल,”

Next Post
” राजकारणातल्या लोकांना अशा पध्दतीने भीती दाखवायला लागले तर देशातील लोकशाहीच संपुष्टात येईल,”

" राजकारणातल्या लोकांना अशा पध्दतीने भीती दाखवायला लागले तर देशातील लोकशाहीच संपुष्टात येईल,"

ताज्या धडामोडी

“छत्रपती संभाजी राजे यांच्यावर टीका करण्याइपत नारायण राणे मोठे नाहीत”

नारायण राणे लिलावतीमध्ये दाखल; अँजिओप्लास्टीची शक्यता

by राजकीय कट्टा
May 27, 2022
0

भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईतील लीलावती रुग्णालयात नारायण राणे यांना दाखल...

उद्धव ठाकरेंच्या पार्टनरचे ‘कसाब’ सोबत संबंध, किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

असा #@# मुख्यमंत्री राज्यांनी पहिला नाही, यांना नोबेल मिळाला पाहिजे – किरीट सोमय्या

by राजकीय कट्टा
May 27, 2022
0

महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर ईडीनं धाड टाकली आहे. एवढंच नाहीतर त्यांच्या निकटवर्तींयांवरही ईडीकडून...

कवठे महांकाळ खून प्रकरणात भाजपच्या पधाधिकाऱ्याला अटक

“इन्स्पेक्टर, तुमचं डोकं ठिकाण्यावर नाही”; भाजपा नेत्याची पोलीस ठाण्यात केली शिवीगाळ

by राजकीय कट्टा
May 27, 2022
0

ग्रेटर नोएडा येथील पोलीस स्टेशनमध्ये भाजपा नेत्याच्या गैरवर्तनाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राज नागर हे...

आरक्षण रद्द हा समाजाच्या दृष्टिकोनातून अत्यंत दुर्दैवी प्रसंग – छत्रपती संभाजी राजे

संभाजीराजे राज्यसभेची निवडणूक लढणार की माघार घेणार? आज होणार स्पष्ट ?

by राजकीय कट्टा
May 27, 2022
0

पुणे | राज्यसभेची निवडणूक संभाजीराजे छत्रपती लढणार की त्यातून माघार घेणार हे आज स्पष्ट होणार आहे. संभाजीराजे छत्रपती आज आपली...

भाजपचे प्रदेक्षाध्यक्ष चंद्रकांत पाटील सरकारमंत्री अमित शहा यांना भेटण्यास दिल्लीत दाखल

पक्षनेतृत्वानं आदेश दिल्यास राज्यसभेची तिसरी जागा लढवू – चंद्रकांत पाटील

by राजकीय कट्टा
May 27, 2022
0

सध्या राज्यसभेच्या निवडणुकीवरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. या निवडणुकांच्या निमित्तानं राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत....

“नरेंद्र मोदी आणि अमित शाह तुम्ही मसनात जा, हिमालयात जाऊन संन्यास घ्या!”

“नरेंद्र मोदी आणि अमित शाह तुम्ही मसनात जा, हिमालयात जाऊन संन्यास घ्या!”

by राजकीय कट्टा
May 27, 2022
0

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत यांनी काल पुण्यात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली. 'तुम्ही दिल्लीत जा, नाही तर मसनात जा....

  • मुखपृष्ठ
  • राजकारण
  • जनरल
  • व्हीडीओ
  • आरोग्य
  • कृषी
  • देश विदेश
  • नौकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक

© 2021 DK Technos - Provides Technical Suppor Contact Us.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • आरोग्य
  • कृषी
  • जनरल
  • देश विदेश
  • नौकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • व्हीडीओ
  • शैक्षणिक

© 2021 DK Technos - Provides Technical Suppor Contact Us.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In