राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून राज्यपाल कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये खटके उडताना दिसून येत होते. सध्या राज्यपाल हे हिंगोली, परभणी आणि नांदेडच्या दौऱ्यावर आहेत. परंतू यावर राज्य सरकारने आक्षेप घेतला आहे. मंत्रिमंडळातील मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नबाव मलिक यांनी राज्यापालांवर टीका केली आहे.
मलिक आज पत्रकार परिषदेत बोलता स्तन त्यांनी हा टोला लागलेला आहे. भगतसिंह कोश्यारी हे आता उत्तराखंडचे मुख्यमंत्री नाहीत, ते आता राज्यपाल आहेत, असा टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे. यासंदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी बोलताना त्यांनी राज्यपालांच्या दौऱ्यावर नाराजी व्यक्त केली.
राज्यपालांच्या हिंगोली, परभणी आणि नांदेडमध्ये दौरा करत आहे. यामधील दोन जिल्ह्यांमधील विद्यापीठांच्या कार्यक्रमांना ते हजेरी लावणार आहेत. यावर आम्हाला आक्षेप नाही मात्र ते या तिन्ही जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. याला आमचा विरोध असून हा सरकारच्या कामात हस्तक्षेप असल्याचं नबाव मलिक यांनी म्हटलं आहे.