Tuesday, July 5, 2022
  • Login
Rajkiyakatta
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • राजकारण
  • जनरल
  • व्हीडीओ
  • आरोग्य
  • कृषी
  • देश विदेश
  • नौकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • राजकारण
  • जनरल
  • व्हीडीओ
  • आरोग्य
  • कृषी
  • देश विदेश
  • नौकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Rajkiyakatta
No Result
View All Result

राज्याचे केंद्राकडे नाही तर केंद्राचेच राज्य सरकारकडे पैसे बाकी

राजकीय कट्टा by राजकीय कट्टा
May 7, 2022
in Uncategorized
0
राज्याचे केंद्राकडे नाही तर केंद्राचेच राज्य सरकारकडे पैसे बाकी
0
SHARES
160
VIEWS

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या अनेक मुद्द्यावरून खटके उडत असल्याचे चित्र दिसून येत आहे अशातच आता केंद्राकडून राज्याला येणाऱ्या परताव्यावरून मुख्यमंत्र्यांच्या टीकेला केंद्रीय मंत्र्याने सोडतोड प्रतिउत्तर दिले आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे केंद्राकडे बोट दाखवून आमचे एवढे पैसे शिल्लक आहेत, तेवढे पैसे शिल्लक आहेत असं सांगत फिरतात. पण राज्याचे केंद्राकडे नाही तर केंद्राचेच राज्य सरकारकडे पैसे बाकी असल्याचे वक्तव्य केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी केलं आहे.

महाविकास आघाडी सरकारनेच राज्यात महागाई वाढवली असल्याचेही भागवत कराड म्हणाले. परभणीत जेष्ठ शेतकरी शेषराव भरोसे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राज्यस्तरीय कृषी संजीवनी महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे. त्याचं उदघाटन भागवत कराड यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते.

महाराष्ट्रासारख्या देशाच्या विकासात सर्वात मोठे योगदान देणाऱ्या राज्याला आर्थिक बाबतीत सापत्न वागणूक दिली जात असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. त्यांच्या या टिकेनंतर भाग भागवत कराड यांनी राज्य सरकारवरच टीका केली आहे.

केंद्राचेच राज्य सरकारकडे पैसे बाकी असल्याचे कराड यांनी म्हटले आहे. तसेच आपल्या भाषणात भागवत कराड यांनी महागाईवरुन थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरच निशाणा साधला. भाजपचे तर आमदार बबनराव लोणीकर यांनी देखील महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. हे महाविकास आघाडीचे सरकार हे बिघाडी असून, सर्व योजना बंद करण्याचे काम केले जात असल्याचा आरोप लोणीकर यांनी केला. दरम्यान, शेतकऱ्यांना 50 हजार कोटी रुपये देणार स्वातंत्र्याच्या इतिहासातील फडणवीस सरकार हे एकमेव सरकार असल्याचेही बबनराव लोणीकर यावेळी म्हणाले

Previous Post

“उचलली जीभ लावली टाळ्याला असे कुणीही करू नये” राऊतांचा पडळकरांना टोला

Next Post

खासगीकरणाची खाज वाढायला लागली आहे, कुठे कुठे खाजवणार? उद्धव ठाकरे यांचा टोला

Next Post
जीव वाचवायला शिवसेना आणि पैसे गोळा करायला भाजपा – उद्धव ठाकरे

खासगीकरणाची खाज वाढायला लागली आहे, कुठे कुठे खाजवणार? उद्धव ठाकरे यांचा टोला

ताज्या धडामोडी

कळंब येथे भैरवनाथ खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस आय.टी.आयला मान्यता-डॉ.प्रतापसिंह पाटील यांची माहिती

कळंब येथे भैरवनाथ खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस आय.टी.आयला मान्यता-डॉ.प्रतापसिंह पाटील यांची माहिती

by राजकीय कट्टा
July 4, 2022
0

कळंब प्रतिनिधी दि.०३- सध्या कौशल्य विकास व्हावा या दृष्टिकोनातून केंद्र सरकार व राज्य सरकार हे प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे. त्यांच्या...

अंबेहोळ येथे कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा

अंबेहोळ येथे कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा

by राजकीय कट्टा
July 2, 2022
0

उस्मानाबाद (राजकीय कट्टा प्रतिनिधी)राज्याचे माजी मुख्यमंत्री मा. डॉ. वसंतराव जी नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त 01 जुलै हा दिवस मौजे अंबेहोळ तालुका...

पीएसआयपदी निवड झाल्याबद्दल रणदिवे यांचा सारोळा येथे नागरी सत्कार

पीएसआयपदी निवड झाल्याबद्दल रणदिवे यांचा सारोळा येथे नागरी सत्कार

by राजकीय कट्टा
July 1, 2022
0

उस्मानाबाद : तालुक्यातील सारोळा (बुद्रुक) गावचे सुपुत्र प्रवीण उमाकांत रणदिवे यांचा पीएसआयपदी निवड झाल्याबद्दल नागरी सत्कार करण्यात आला. सारोळा येथे...

आ.ज्ञानराज चौगुलेंच्या निषेधार्थ उमरग्यात संतप्त शिवसैनिकांनी काढली रॅली

आ.ज्ञानराज चौगुलेंच्या निषेधार्थ उमरग्यात संतप्त शिवसैनिकांनी काढली रॅली

by राजकीय कट्टा
June 29, 2022
0

उमरगा-उमरगा तालुक्यातील संतप्त शिवसैनिकांनी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या निषेधार्थ मंगळवारी शहरातून रॅली काढली. या रॅलीचे नेतृत्व माजी तालुका प्रमुख सुरेश...

कन्हेरवाडी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार..

कन्हेरवाडी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार..

by राजकीय कट्टा
June 22, 2022
0

कळंब (राजकीय कट्टा प्रतिनिधी)भारतीय जनता पार्टी कन्हेरवाडी यांच्या तर्फे विद्या विकास हायस्कूल कन्हेरवाडी येथे गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सत्कार...

कळंब येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाच्या मंजूरीचा मार्ग सुकर-आ.कैलास पाटील

एकनाथ शिंदे यांच्या तावडीतून निसटला सेना आमदार, केला चिखलातून पायी प्रवास..

by राजकीय कट्टा
June 22, 2022
0

उस्मानाबाद : राज्यात सध्या राजकीय ड्रामा पहायला मिळत आहे. शिवसेना नेते तथा मंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या काही आमदारासह सुरत...

  • मुखपृष्ठ
  • राजकारण
  • जनरल
  • व्हीडीओ
  • आरोग्य
  • कृषी
  • देश विदेश
  • नौकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक

© 2021 DK Technos - Provides Technical Suppor Contact Us.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • आरोग्य
  • कृषी
  • जनरल
  • देश विदेश
  • नौकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • व्हीडीओ
  • शैक्षणिक

© 2021 DK Technos - Provides Technical Suppor Contact Us.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In