अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार समाधान आवताडे विजयी झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा पराभव केला आहे. या विजयानंतर भारतीय जनता पक्षाच्या अनेक बड्या नेत्यांनी आघाडी सरकारच्या अनेक नेत्यावर सडकून टीका केली होती. त्यातच आता भाजपा नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला आहे.
ते म्हणाले की, ५० ते ६० हजार मतांनी राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके हे निवडून येणार असे काहीजण सांगत होते. पण मतदारांनी भाजपच्या या विजयानंतर त्यांना दाखवून दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गर्व झाला होता. त्यांची टगेगिरी भाषा होती. तो गर्व मोडून काढला अशी प्रतिक्रिया पडळकरांनी दिलेली आहे. महाराष्ट्रातील पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदासंघातील पोटनिवडणुकीचीसुद्धा मतमोजणी पार पडली. यामध्ये भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांचा विजय झाला. या विजयानंतर गोपीचंद पडळकर यांनी सांगलीत प्रतिक्रिया दिली.
आज महाविकास आघाडीचा गर्व पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात फोडण्यात आला. देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत बसून योग्य नियोजन केले. आपला उमेदवार 50 ते 60 हजार मतांनी निवडून येणार असे राष्ट्रवादीचे नेते सांगत होते. पण मतदारांनी त्यांना दाखवून दिले. अजित पवार यांना गर्व झाला होता. त्यांची टगेगिरी भाषा होती. तो गर्व मोडून काढला, असे गोपीचंद पडळकर म्हणाले.आता त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादीचे नेते काय उत्तर देतात हे पाहावे लागणार आहे.