मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव केला होता. मात्र दुसरीकडे ममता बॅनर्जी यांना आपल्या जागेवर पराभवाचा सामना करावा लागला होता. याच पार्श्वभूमीवर आता पुन्हा त्या भवानीपूरमधून पोट निवडणुकीसाठी सज्ज झाल्या आहेत. तसेच त्यांनी मोदी सरकारला आव्हान दिले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भवानीपूर येथील रॅलीदरम्यान भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे.
जनतेला संबोधित करताना त्यांना ताबिलानचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही जहरी टीका केली आहे. ‘नरेंद्र मोदी जी, अमित शहा जी, आम्ही भारताचा तालिबान होऊ देणार नाही.’ अशी टीका करत त्यांना मोदी सरकारला टार्गेट केले. यावेळी बोलताना ममता म्हणाल्या की, “भारत एकजुटेच राहील. गांधीजी, नेताजी, विवेकानंद, सरदार वल्लभभाई पटेल, गुरुनानक जी, गौतम बुद्ध, जैन सर्व या देशात एकत्र राहणार आहोत. आम्ही कोणालाही भारताचे विभाजन करु देणार नाही.”
ममता पुढे म्हणाल्या, “भाजप एक ‘खोटारडा’ पक्ष आहे. ते खोटे बोलतात की, आम्ही राज्यात दुर्गापूजा, लक्ष्मी पूजनाला परवानगी दिली नाही. पण जर भाजपचे लोक कलम १४४ लावत राहिले तर दुर्गा पूजा कशी होईल? बंगालच्या भवानीपूर मतदारसंघात 30 सप्टेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे.