मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यान्चीऔरंगाबाद येथे सभा पार पडली. यानंतर आता मुंबई पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना नोटीसा बजावण्यास सुरुवात केली आहे. भोंगा प्रकरणी मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी मनसेसोबतच बजरंग दल, विश्व हिंदू परीषद आणि हिंदू दलाच्या कार्यकर्त्यांना नोटीसा पाठवल्या आहेत.
या पाठवलेल्या नोटीसप्रमाणे या सर्वांना 2 मे ते 17 मे या काळात मुंबई सोडण्याचे आदेश जारी केले गेले आहेत. राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांवर मुंबई पोलिसांच्या कारवाईचा बडगा, अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर आता हे पाऊल या कार्यकर्त्यांना या काळात मुंबईत वावर करण्यात किंवा थांबण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. मुंबई घाटकोपर ठाण्याच्या हद्दीत ३ मे रोजी साजरी होणाऱ्या ईद सणाच्या काळात आपण मुंबई हद्दीत वावरु नये. कारण आपण मुंबईतील कायदा सुव्यवस्था बिघडवू शकता, असा आदेश यात देण्यात आला आहे.
संपूर्ण मुंबईभर हे आदेश जारी करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत कलम १४४ आणि १८८ लागू करण्यात आले आहेत. म्हणजेच शहरात जमावबंदी आणि सरकारी आदेश लागू करण्यात आले आहेत. दोन बड्या नेत्यांची सभा, राज ठाकरेंचा राष्ट्रवादीवर, तर फडणवीसांचा शिवसेनेवर प्रचंड प्रहार मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी महाआरती आणि हनुमान चालीसा पठणाची तयारी सुरु केली आहे. मात्र नोटीस पाठवल्यानंतरही कार्यकर्ते हनुमान चालीसा पठणाबाबत ठाम असल्याचं पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.