Saturday, August 13, 2022
  • Login
Rajkiyakatta
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • राजकारण
  • जनरल
  • व्हीडीओ
  • आरोग्य
  • कृषी
  • देश विदेश
  • नौकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • राजकारण
  • जनरल
  • व्हीडीओ
  • आरोग्य
  • कृषी
  • देश विदेश
  • नौकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Rajkiyakatta
No Result
View All Result

आघाडी सरकारने उद्योग क्षेत्राचा विश्वास गमावल्याने महाराष्ट्राच्या जीएसटी संकलनात घट – भाजपा

राजकीय कट्टा by राजकीय कट्टा
April 2, 2021
in राजकारण
0
आघाडी सरकारने उद्योग क्षेत्राचा विश्वास गमावल्याने महाराष्ट्राच्या जीएसटी संकलनात घट – भाजपा
0
SHARES
185
VIEWS

देशाची अर्थव्यवस्था वेगाने पूर्वपदावर येत असल्याचे मार्च मधील जीएसटी संकलनावरून दिसून येत आहे. महाराष्ट्रात मात्र आघाडी सरकारच्या नाकर्त्या धोरणामुळे राज्याच्या जीएसटी संकलनात लक्षणीय घट झाली आहे. राज्य सरकारच्या धरसोड वृत्तीमुळे, खंडणीखोरीमुळे उद्योग क्षेत्राचा महाराष्ट्र सरकारवरील विश्वास उडत चालला आहे, अशी टीका भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक यांनी शुक्रवारी केली.


भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना श्री. पाठक यांनी सांगितले की, मार्च मधील जीएसटी संकलनाने आजवरचा विक्रम (1 लाख 24 हजार कोटी) नोंदविला आहे. या संकलनात महाराष्ट्राचा वाटा मोठा असेल अशी अपेक्षा होती. मात्र सन 2020-21 मधील जीएसटी संकलन त्याआधीच्या वर्षाच्या तुलनेत 21 हजार 600 कोटींनी कमी झाले आहे. बिहार, पंजाब, गुजरात, तामीळनाडूसारख्या राज्यांनी देखील महाराष्ट्रास करसंकलनाच्या टक्केवारीत मागे टाकले आहे. सरकारी अनागोंदीमुळे औद्योगिक क्षेत्रात निराशा आहे, याचाच हा पुरावा आहे.


धरसोड धोरण, प्रशासनावरील सैल झालेली पकड, यांमुळे राज्याच्या तिजोरीत येणारा पैसा खंडणीच्या रूपाने खाजगी खिसे भरू लागल्याने महसुलात घट होऊ लागली आहे. एका बाजूला संकटावर मात करून देशाची अर्थव्यवस्था झपाट्याने पूर्वीपेक्षाही नवी उंची गाठत असताना, महाराष्ट्र मात्र, अर्थव्यवस्थेचा आलेख घसरता असेल असे भाकित करून मोकळा झाला आहे. नव्या आर्थिक वर्षात राज्याची अर्थव्यवस्था उणे 8 (-8) एवढी असेल अशी कबुली राज्य सरकारने आर्थिक पाहणी अहवालातच दिल्याने नकारात्मक आणि निराश मानसिकता केव्हाच स्पष्ट झाली आहे, असेही श्री. पाठक यांनी नमूद केले.


पाठक म्हणाले की, वर्ल्ड बँक, मूडीज यासारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्थांनी भारताच्या जीडीपी मध्ये 7 ते 11 टक्के एवढी वाढ होईल असा अंदाज वर्तविला आहे. मात्र, महाराष्ट्र मागे राहणार असे स्पष्ट चित्र आत्ताच्या परिस्थितीतून दिसत आहे. महाविकासा ऐवजी महावसूली करण्याचेच धोरण या सरकारने अवलंबले असल्याने उद्योग विश्वात नाराजी आहे. राज्यातील उद्योग आपला गाशा गुंडाळून इतर राज्यात जात आहेत. एमआयडीसीची साईट हॅक झाल्यावर तात्काळ कारवाई करणे गरजेचे होते. कारण त्यामध्ये विविध उद्योगांविषयी महत्त्वाची माहिती असते. मात्र यासंबंधी तक्रार दाखल करण्यासाठीही 10 दिवस लागले. राज्य सरकारमधील समन्वयाचा अभाव, धरसोड वृत्ती याचे परिणाम जनतेला भोगावे लागत आहेत, असेही ते म्हणाले

Previous Post

“मोदी रस्त्यावर बसून महिलांना आवाज देणाऱ्या .” तृणमूलच्या खासदाराने लगावला टोला

Next Post

पुण्यातील कठोर निर्बंधांना भाजपचा विरोध, या सेवा सुरु ठेवण्याची केली मागणी

Next Post
पुण्यातील कठोर निर्बंधांना भाजपचा विरोध, या सेवा सुरु ठेवण्याची केली मागणी

पुण्यातील कठोर निर्बंधांना भाजपचा विरोध, या सेवा सुरु ठेवण्याची केली मागणी

ताज्या धडामोडी

देवेंद्र फडणवीस यांची कार्यपद्धती अजित दादा सारखी-आ.रोहित पवार यांचे गौरवोदगार

देवेंद्र फडणवीस यांची कार्यपद्धती अजित दादा सारखी-आ.रोहित पवार यांचे गौरवोदगार

by राजकीय कट्टा
August 11, 2022
0

rohit मुंबई (राजकीय कट्टा प्रतिनिधी) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस हे अजित पवार यांची कार्यशैली ही आमचे काका विधानसभेचे विरोधी पक्षनेते...

बेकायदेशीर गुंठेवारीप्रकरणी नगर अभियंत्याच्या विभागीय चौकशीचे आदेश -नागेश अक्कलकोटे

बेकायदेशीर गुंठेवारीप्रकरणी नगर अभियंत्याच्या विभागीय चौकशीचे आदेश -नागेश अक्कलकोटे

by राजकीय कट्टा
August 10, 2022
0

बार्शी (राजकीय कट्टा प्रतिनिधी) बार्शी शहरातील ग्रीन झोनमधील बेकायदेशीर गुंठेवारी प्रकरणी चौकशीत दोषी आढळलेल्या नगर अभियंता भारत विधाते यांच्या विभागीय...

नुकसानीच्या तुलनेत जाहीर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी-आमदार कैलास घाडगे पाटील

नुकसानीच्या तुलनेत जाहीर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी-आमदार कैलास घाडगे पाटील

by राजकीय कट्टा
August 10, 2022
0

उस्मानाबाद ता. 10-भाजप सरकारने शेतकऱ्यांना जाहीर केलेली रक्कम अत्यंत तुटपुंजी आहे,सत्तेवर आल्यावर शेतकऱ्यांचे हित बघणार असे सांगणाऱ्या सत्ताधाऱ्यांवर जेव्हा प्रत्यक्षात...

मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांचे बंड थंडावणार,विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला हा शब्द

मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांचे बंड थंडावणार,विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला हा शब्द

by राजकीय कट्टा
August 10, 2022
0

मुंबई (राजकीय कट्टा प्रतिनिधी) मोहोळ तालुक्याचे माजी आमदार राजन पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे हे राष्ट्रवादी पक्ष सोडणार...

आज शिंदे फडणवीस सरकारचा होणार मंत्रिमंडळ शपथविधी

आज शिंदे फडणवीस सरकारचा होणार मंत्रिमंडळ शपथविधी

by राजकीय कट्टा
August 9, 2022
0

मुंबई (राजकीय कट्टा प्रतिनिधी) शिंदे-फडणवीस सरकारचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळाचा शपथविधी आज सकाळी 11 वाजता होणार आहे. यामध्ये आपली वर्णी लागावी याकरिता...

सोलापुरातील चिंचपूरमध्ये उद्धव ठाकरेंचें यश;  सात पैकी सात सदस्य विजयी

सोलापुरातील चिंचपूरमध्ये उद्धव ठाकरेंचें यश;  सात पैकी सात सदस्य विजयी

by राजकीय कट्टा
August 5, 2022
0

सोलापुर: राज्यातली सत्ता हातून गेल्यानंतर शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाचे 7 पैकी 7 सदस्य निवडून आलेत. सोलापूरमध्ये उध्दव ठाकरे यांच्या गटाचं पहिलं खातं...

  • मुखपृष्ठ
  • राजकारण
  • जनरल
  • व्हीडीओ
  • आरोग्य
  • कृषी
  • देश विदेश
  • नौकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक

© 2021 DK Technos - Provides Technical Suppor Contact Us.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • आरोग्य
  • कृषी
  • जनरल
  • देश विदेश
  • नौकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • व्हीडीओ
  • शैक्षणिक

© 2021 DK Technos - Provides Technical Suppor Contact Us.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In