जालना सहकारी साखर कारखान्यात अर्जुन खोतकर मित्र परिवाराने भागीदारीत बेनामी व्यवहार केला आहे. भागधारकांमध्ये मुंबईचे सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या पत्नी रुपाली विश्वास नांगरे-पाटील, सासरे पद्माकर मुळे यांचे नाव आहे. त्यामुळे विश्वास नांगरे-पाटलांनी हा बेनामी कारखाना विकत घेतला, असा दावा भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच याच प्रकरणाची CBI चौकशी करावी अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.
सोमय्या म्हणाले की, महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकार माफिया सरकार आहे. कधी धमकी देऊन तर, कधी नौटंकी करून या सरकारचा कारभार चालला आहे. शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी धमकी दिली. मात्र, अनिल देशमुख यांच्यावर त्यांचे प्रेम आहे की, अजित पवार यांची त्यांना काळजी आहे. जरंडेश्वरमध्ये अजित पवार यांनी जे केले, तेच अर्जुन खोतकर यांनी जालना साखर कारखान्यात केले.
पद्माकर मुळे, रूपाली विश्वास नांगरे-पाटील हे भागधारक आहेत. विश्वास नांगरे-पाटील यांना चौकशी होईपर्यंत सेवेतून मुक्त करावे, अशी मागणी करून नांगरे-पाटील म्हणाले, गेल्या चोवीस महिन्यांत आपण शंभर घोटाळे बाहेर काढले. सहा मंत्र्यांना अटक किंवा जेलची हवा खावी लागली. २४ हून अधिक घोटाळ्यांची सीबीआय, आयकर विभाग, पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. १८ प्रकरणांत न्यायालय, लोकायुक्त, एनजीटी, ग्रीन प्राधिकरण, मानव अधिकार आयोग, पोलीस प्राधिकरणात सुनावणी सुरू आहे.