पश्चिम बंग विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी भारतीय जनता पक्षाचा दणदणीत पराभव करून विजय प्राप्त केला आहे. यावरूनच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ममता दीदींचे कौतुक करून मोदी-शहा यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. तसेच पवारांच्या अदृश्य पाठिंब्यामुळे ममता दीदींचा विजय झाला आहे असे वक्तव्य राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केले आहे.
आता राष्ट्रवादीच्या या दाव्याला भाजपा नेते आणि माजी आमदार नितेश राणे यांनी जोरदार टोला लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांचे अदृश्य हात असल्यामुळे ममता बॅनर्जी बंगालमध्ये जिंकल्या असं काही जण म्हणतायत, पण पवारांचे महाराष्ट्रात प्रत्यक्ष हात असून सुद्धा पंढरपूरची एक सीट राष्ट्रवादी जिंकू शकली नाही असा टोला भाजपचे नेते, महाराष्ट्र प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी राज्य सरकारला लगावला आहे.
पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीमध्ये भाजपचे समाधान आवताडे यांनी विजय मिळवला. ही निवडणूक शेवटच्या फेऱ्यापर्यंत अटीतटीची सामना पाहायला मिळाला. राष्ट्रवादी कॉंग्रेसने निवडणूक जिंकावी म्हणून एक महिना आधीच ठाम मांडून बसले होते. मात्र भाजपने जलवा दाखवत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला चेकमेट केलं. ठाकरे सरकारमधील मंत्री मंडळांच्या मत्र्यांचे जाहीर सभा होऊन सुद्धा पंढरपूरकरानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला नाकारल. पश्चिम बंगाल मध्ये शरद पवारांचा अदृश्य हात होता म्हणून ममता बॅनर्जी जिंकल्या मग महाराष्ट्रात पवारांचा हात असून सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पंढरपूरची सीट काढता आली नाही अशी प्रतिक्रिया राणें यांनी ट्विट द्वारे मांडली आहे.