नवी दिल्ली : सध्या देशभरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरताना दिसत आहे. आज मोठ्या संख्याने रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे तसेच मृत्यूचे प्रमाणही काही अंशतः वाढलेले दिसून येत आहे. त्यात देशभरात व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, बेड आणि कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा निर्माण होत आहे. भारतातील कोरोनाचे भयावह चित्र देशासोबत जगभरातील सर्व देशांच्या वृत्तपत्र आणि टीव्ही चॅनेल्समध्ये दाखवले जात आहे. ज्यावर अभिनेत्री कंगना राणावतने आक्षेप नोंदवला आहे.
कंगनाने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओत ती आंतरराष्ट्रीय मीडिया आणि भारतातील विचारवंतांवर निशाणा साधताना दिसते आहे. या व्हिडीओत ती म्हणाली की, कोरोनाशिवाय बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्यांची मला तुमच्यासोबत चर्चा करायची आहे. कधी तुम्ही पाहिले आहे भारतात कोणती आपत्ती येते, संकट येते तेव्हा एक आंतरराष्ट्रीय मोहीम राबवली जाते आणि सर्व देश एकत्र येतात.
भारताला असे दाखवले जाते की जसे तुम्ही लोक तर आता आता माकडाचे माणूस बनले आहात. चार गोऱ्यांशिवाय जोपर्यंत ते येऊन गुलाम नाही बनवत तोपर्यंत तुम्हाला ते सांगणार नाहीत काय करायचे, कसे उठायचे, बसायचे, खायचे आहे. तुम्हाला तर माहित नाही की लोकशाही काय आहे. तुम्हाला कोणाचे ऐकले पाहिजे. आपल्याकडे बुद्धीमत्ता नाही. तर ते आपल्याला सांगणार काय करायचे आहे.
पुढे टी म्हणते की, तुम्ही सांगा टाइमच्या मासिकावर मृतदेहांचे फोटो येतात. हे फोटो बेस्ट सेलिंग आहेत. बरखा दत्तजी जातात सीएनएनवर. रडतात की आम्ही लोक माकड आहोत.राणा अय्यूब आणि अरुंधती रॉय हे सर्व भारतीय आहेत. हे लोक त्यांचे सोर्स बनतात. जे जागतिक पातळीवर भारताची प्रतिमा मलीन करतात. अशी टीका तिने केली आहे.