मुंबई | राज्यात आघाडीचे सक्कर स्थापन झाल्यापासून महाविक आघाडी सरकार आणि राज्यपाल कोश्यारी यांचयात वाद होत असल्याचे चित्र अनेकदा दिसून आले होते. तसेच विरोध बसलेले भारतीय जनता पक्षाचे नेते विविध मुद्द्यावरून आघाडीच्या तक्रारी घेऊन राजभवनावर पोहचताना दिऊन आले होते. त्यातच आता भाजप नेते राज्यपालांची भेट घेणार अशा बातम्या चालवल्या जात आहे. त्यावरून नवाब मलिक यांनी जोरदार प्रहार केला आहे. राज्यपाल भवन हे राजकीय अड्डा झाला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे भाजपचे नेते आहेत, अशी टीकाही त्यांनी केली आहे
तसेच मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यपालांच्या या दौऱ्यावरील राज्य सरकारची नाराजी व्यक्त केली होती. राज्यपालांचा हिंगोली, परभणी आणि नांदेडमध्ये दौरा आहे. या तीन पैकी दोन जिल्ह्यात राज्यपाल विद्यापीठातील कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. त्याला आमचा आक्षेप नाही. मात्र या तिन्ही जिल्ह्यात ते जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आढावा घेणार आहेत. त्याला आमचा विरोध आहे. हा सरकारच्या कामात हस्तक्षेप आहे. असं नवाब मलिक यांनी म्हटलं होतं.
विद्यापीठातील कार्यक्रमावर आक्षेप नाही. मात्र, उद्घाटन आणि प्रशासनासोबतच्या बैठकींवर राज्य मंत्रीमंडळात नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. या बैठका म्हणजे राज्यात दोन वेगळी सत्ताकेंद्र निर्माण करण्याचं काम केलं जात असल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. तसंच राज्याच्या मुख्य सचिवांना राज्यपालांच्या सचिवांना याबाबत अवगत करण्यास सांगितलं आहे. त्यानुसार राज्याचे मुख्य सचिव राज्यपालांच्या सचिवांची भेट घेतील. राज्यपालांच्या दौऱ्यात राज्य सरकारच्या अधिकारांवर गदा आणली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.