राज्यात कोरोना रुग्णसंख्या मोट्या प्रमाणात वाढताना दिसत आता तर दुसरीकडे राज्यात मोट्या प्रमाणात कोरोना संसर्गावर प्रभावी ठरलेल्या रेमडीसीवर औषधाचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे जिल्हाधीकारी कार्यालयाला रेमडीसीवर औषधांबाबत सर्व अधिकार देण्यात आलेले आहे. मात्र अद्यापही राज्यात औषधाचा तुटवडा जाणवू लागल्यामुळे भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
राज्यात आजही रेमडेसिवीरचा काळाबाजार होत आहे. त्यामुळे कोरोना झालेल्या आमदार आशिष शेलार यांना रेमडेसिवीर मिळत नसल्याचा दावा आमदार प्रसाद लाड यांनी केला आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते. राज्यातील रेमडेसिवीरचा तुटवडा लक्षात घेता भाजप नेत्यांनी विविध औषध कंपन्यांकडे चाचपणी करून इंजेक्शन मिळवण्याच्या प्रयत्नाचा केला. त्यामघ्ये दमणला मधील एका कंपनीने भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना (प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर) ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन देण्याचं आश्वासन दिले होते.
मात्र, या कंपनीला राज्य सरकारने पत्र न दिल्यानं अद्यापर्यंत रेमडेसिवीर मिळाले नाहीत. असा दावा लाड यांनी केला आहे. रेमडीसीवर इंजेक्शनचा काळा बाजार करू नये. अशी मागणी केली आहे. प्रधान सचिव प्रदीप व्यास यांनी एक पत्र सर्व आमदारांना पाठवलं होतं. ज्यामध्ये रेमडिसिवर इंजेक्शनचा साठा कोणत्या कोणत्या सेंटरवर (स्टॉक) उपलब्ध आहे. या बद्दल माहिती दिली होती. पण कोणत्याही सेंटर ला फोन केला असता, साठा उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे.