(कोल्हापूर प्रतिनिधी) राज्यात मागच्या काही दिवसांपासून अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. काहीच दिवसांपूर्वी मंत्री राजेश टोपे, मंत्री अनिल देशमुख, मंत्री राजेंद्र भरणे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. यावरून विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देऊ शकत नसल्यामुळे कोरोनाचा बाऊ करून अर्थसंकल्पीय अधिवेशनातून पळ काढण्यासाठी बाऊ केला जात आहे अशी टीका विरोधकांनी केली होती. या टीकेला आता मंत्री हसन मुश्रीफ यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले आहे.
अधिवेशन आलं की कोरोना होतो हा विरोधी पक्षाचा आरोप चुकीचा आहे. त्यांना जर एवढंच वाटतंय तर त्यांनी कोरोनाबाधित मंत्र्यांच्या संपर्कात यावं असे उत्तर मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहे, ते काल कोल्हापुरात पत्रकार माध्यमांशी बोलताना बोलत होते.
तसेच कोरोना विषयावरून विरोधकांनी राजकारण थांबवावे अशी विनंती सुद्धा मुश्रीफ यांनी केली आहे. सरकार कोरोनाचे कारण पुढे करून विरोधकांच्या आणि जनतेच्या प्रश्नापासून पळ काढत असल्याचा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्या टीकेला मुश्रीफ यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले आहे.