मुंबई | भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर राज्यभरात शविसेना आक्रमक झाली असून आय युवासेनेने राणे यांच्या जुहूच्या बंगल्याखाली आंदोलन सुरु केले होते. तर दुसरीकडे शिवसैनिकांनी नारायण राणेंच्या प्रतिमेला जोडो मारले, शाईफेक केली. इतकंच नाही तर नाशिक आणि ठाण्यात शिवसैनिकांनी भाजपच्या कार्यकर्त्यावर दगडफेक केली. नाशिक पोलीस आणि पुणे पोलिसांचं पथक नारायण राणे यांना अटक करण्यासाठी कोकणात रवाना झाले आहेत.
या सर्व राड्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी कृष्णकुंज या निवासस्थानी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. दोघात काहीकाळ चर्चा झाली . राज्यातील आजच्या राजकीय परिस्थिती बाबत चर्चा झाली. जे काही सुरू आहे ते व्हायला नको होतं, चुकीच्या पद्धतीने सर्व काही होत आहे, असं मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडल्याची सूत्रांची प्राथमिक माहिती. राज ठाकरे सध्या तरी या विषयावर अधिकृतपणे बोलणार नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मुख्यमंत्र्यांना देशाचा कितवा स्वातंत्र्य दिवस हे आठवत नाही, जर त्या ठिकाणी मी असतो तर कानाखाली खेचली असती, असं टोकाचं वक्तव्य नारायण राणे यांनी केलं होतं. या वक्तव्यावरुन नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रायगड, महाड, नाशिकमध्ये राणेंविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच राणे यांना आता काही वेळेपूर्वीच अटक करण्यात आली आहे.