राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १४ एप्रिलपासून लॉकडाऊन जाहीर केला होता. त्यातच येत्या ३१ मे रोजी लागू करण्यात आलेला लॉकडाऊनची मुदत संपुष्ठात येत असून १ जुने नंतर लॉकडाऊन लागू राहणार की सर्व पूर्वरत होणार असा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे. त्यातच आता याच मुद्दयावरून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचयव्हर टीकास्त्र सोडले आहे.
आहेत. लॉकडाऊन उठला नाही, तर १ जूनपासून औरंगाबादमध्ये लॉकडाऊनच्या निर्बंधांचं पालन केलं जाणार नाही. दुकानं उघडली जातील, असा थेट इशारा खासदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे. लॉकडाऊन शिथील करण्याची गरज आता आहे. कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊन मागे घेतला गेला पाहिजे नाहीतर लोकं स्वत: लॉकडाऊन आता पाळणार नाहीत. औरंगाबादची जनता तर नक्कीच १ जूनपासून लॉकडाऊनचं पालन करणार नाही.
दोन महिन्यांपूर्वी शहराचा कोरोनाचा आकडा १८०० वर गेला होता, पण आज आपण १२० वर आलो आहोत. ग्रामीण भागात २०० च्या आसपास आलो आहोत. लोकांनी इतकं सहकार्य दिलं, इतकं कष्ट सहन करुन आकडेवारी कमी केली. आता पुन्हा पंतप्रधान, मुख्यमंत्री टीव्हीवर येऊन आमच्यासमोर ज्ञान पाजळणार असतील तर कोणीही कोणाचं ऐकणार नाही. मग पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा मी सांगितलं तरी लोक १ तारखेनंतर ऐकणार नाहीत असं इम्तियाज जलील म्हणाले.