पंढरपूर : पंढरपूर येथे भाजपा उमेदवार समाधान अवताडे यांच्या प्रचारावेळी राष्ट्रवादीवर गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या टीकेचा आता आमदार रोहित पवार यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ते ज्यांच्यावर जनतेचा विश्वास नाही, ज्यांना कोण राजकारणात विचारात नाही अशी लोक राजकारण करण्यासाठी पवार कुटुंबाचे नाव मोठे होतात. ते विकासाविषयी बोलतच नाहीत, अशी टीका आमदार रोहित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांचे नाव न घेता पंढरपुरात केली.
विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी ते पंढरपुरात आले होते. पंढरपुरात त्यांनी तीन सभा घेत प्रचार केला. विठ्ठल साखर कारखान्यावरून राजकारण केले जात आहे. करमाळा येथील आदिनाथ साखर कारखाना हा शेतकर्यांच्या हितासाठी चालविण्यासाठी घेतला आहे.
मात्र पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल सहकारी कारखाना हा सहकार तत्त्वावर व सध्याच्या संचालक मंडळानुसारच चालणार आहे. विठ्ठल सहकारी कारखाना कोणत्याही प्रकारे चालविण्यासाठी घेण्याचा विचार नाही. मात्र कारखान्यासाठी कोणतीही मदत देण्याची राज्य सरकारची तयारी असल्याचेही ते म्हणाले. तसेच
पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचा विकास करण्यासाठी महाविकासआघाडी सक्षम असल्याचेही ते यावेळी म्हणाले.