केंद्र सरकारने पारित केलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधात शेजारी मागच्या दीड वर्षांपासून दिल्लीच्या वेशीवर अंदोलन करत असून अद्याप हे कायदे केंद्राने मागे घेतलेले नाहीये. त्यातच याच पार्श्वभूमीवर शेजाऱ्यांनी सोमवारी भारत बंदची हाक दिली होती. तसेच य भारत बंदमध्ये अनेक संघटना शुद्ध सामील झाल्या होत्या. याला देशात संमिश्र प्रतिसाद मिळाला. उत्तरेकडील काही राज्ये वगळता याचा फारसा परिणाम दिसला नाही.
या पार्श्वभूमीवर भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते आणि शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी भारतीय जनता पक्ष आणि मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले असून, ‘भारत बंद’ची संकल्पना भाजपवाल्यांकडूनच मिळाल्याचा टोला यावेळी त्यांनी लगावला. काँग्रेस, शिवसेना यासह अन्य पक्षांनी शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’ला पाठिंबा दर्शवला होता. उत्तर प्रदेशमध्ये सुमारे ८०० ठिकाणी शांततेत आंदोलन पार पडले. काही ठिकाणी दुकाने खुली होती.
मात्र, आंदोलनाची प्रभाव कमी झाला नाही. आंदोलन यशस्वी ठरले, अशी माहिती देत केंद्रीय कृषी मंत्र्यांनी कायदा रद्द न करण्याच्या अटीवर चर्चेसाठी तयार असल्याचे म्हटले आहे. त्यात बदल करू असेही म्हटले आहे. सरकारने आधीच ठरवून ठेवले असेल, तर चर्चा करण्यात काही अर्थ नाही, असे राकेश टिकैत यांनी म्हटले आहे.