Thursday, June 30, 2022
  • Login
Rajkiyakatta
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • राजकारण
  • जनरल
  • व्हीडीओ
  • आरोग्य
  • कृषी
  • देश विदेश
  • नौकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • राजकारण
  • जनरल
  • व्हीडीओ
  • आरोग्य
  • कृषी
  • देश विदेश
  • नौकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Rajkiyakatta
No Result
View All Result

अंतर्गत भ्रष्टाचारामुळे वीज कंपन्या डबघाईस आल्या – बावनकुळे आक्रमक

राजकीय कट्टा by राजकीय कट्टा
March 8, 2022
in महाराष्ट्र
0
अंतर्गत भ्रष्टाचारामुळे वीज कंपन्या डबघाईस आल्या – बावनकुळे आक्रमक
0
SHARES
168
VIEWS

नागपूर / मुंबई : आमच्या सरकारच्या काळात महाराष्ट्रातील तीनही वीज कंपन्या नफ्यात होत्या. मग आता तोट्यात जाण्याचे कारण काय ? वीज बिलाचे थकीत प्रकरण तेव्हाही होतेच पण आम्ही शेतकऱ्यांची वीज तोडली नाही. राज्याची स्थिती इतकी वाईट आहे की, उद्या महाराष्ट्रातील तमाम मंत्र्यांना ऊर्जा खात्याच्या विरोधात आंदोलन करावे लागेल. वीज कंपन्या अंतर्गत भ्रष्टाचारामुळे डबघाईस आल्या आहेत. त्याचा फटका शेतकऱ्यांनी का सोसावा असा आक्रमक प्रश्न राज्याचे माजी ऊर्जा मंत्री आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी विचारला.

मुंबईत विधान परिषदेत आ. चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. त्यांनी ऊर्जा मंत्रालयाकडून होत असलेली वसुली मोघलाई असल्याचा आरोप केला. अधिवेशनाच्या गेल्या सत्रात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वीज तोडणार नाही असे जाहीर केले होते अन् दुसऱ्याच दिवशी ऊर्जा मंत्र्यांनी वीज कनेक्शन तोडण्याची घोषणा केली, हे अन्यायकारक होते. एकीकडे राज्यातला शेतकरी अवकाळी पावसामुळे हवालदिल झाला आहे. त्याला सात हजार कोटींची नुकसान भरपाई महाविकास आघाडीने अजूनही दिलेली नाही. आता तरुण शेतकऱ्यांना विज तोडणीवरून आत्महत्या कराव्या लागत आहेत. ही अत्यंत लाजिरवाणी बाब असल्याचे आ. बावनकुळे म्हणाले.

आज कोट्यवधी शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. ऊर्जा मंत्रालयाने शेतकऱ्यांच्या वीज तोडणीबाबत निर्णय घेतला नाही तर अधिवेशनाला महत्व राहणार नसल्याचे आ. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. महत्वाचे म्हणजे यावेळी त्यांनी गेल्या सरकारच्या कार्यकाळातला प्रसंग सांगितला. नागपुरात अधिवेशन होते आणि मा. श्री. शरद पवार यांनी आंदोलनात भाषण दिले. मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी संकटात असल्याचे सांगत त्यांनी वीज बिल आणि शेतसारा वसुली करू नका असे म्हटले होते. आम्ही त्यांच्या बोलण्याचा आदर केला. लगेच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज तोडणी करणार नसल्याची घोषणा केल्याची आठवण आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी करून दिली. परंतु विद्यमान ऊर्जामंत्री त्यांच्याच उपमुख्यमंत्र्यांचेही ऐकत नसल्याचे ते म्हणाले.

समस्या आमच्या वेळीही होत्या असे सांगताना आ. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, विजेच्या बिलाचा ताळमेळ लागत नव्हता, शेतकऱ्यांच्या नावाने चुकीचे बिलं निघत होते. ४२ हजार कोटींची थकबाकी होती. तरीही उत्पादन खर्च कमी करून आम्ही राज्यातील तीनही वीज निर्मिती प्रकल्प नफ्यात आणले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना २८ हजार कोटींची वीज दिली. २००५ ते २०१५ काळातील सरकारने साडेसात लाख शेतकऱ्यांचे वीज जोडणीचे अर्ज प्रलंबित ठेवले. त्याचाही निपटारा केला. एवढ्या संकट काळातही आम्ही एकाही शेतकऱ्याचे कनेक्शन तोडले नाही याचा मला अभिमान वाटतो, असे आ. बावनकुळे म्हणाले.

Previous Post

शिवसेनेत अंतर्गत वाद चव्हाट्यावर, उद्धव ठाकरे बंडखोरांवर कारवाई करण्याच्या तयारीत ?

Next Post

“माझ्या कीर्तनांवर कोट्यधीश झाले अन्…” इंदुलकर महाराजांचे पुन्हा वादग्रस्त विधान

Next Post
“माझ्या कीर्तनांवर कोट्यधीश झाले अन्…” इंदुलकर महाराजांचे पुन्हा वादग्रस्त विधान

"माझ्या कीर्तनांवर कोट्यधीश झाले अन्…" इंदुलकर महाराजांचे पुन्हा वादग्रस्त विधान

ताज्या धडामोडी

आ.ज्ञानराज चौगुलेंच्या निषेधार्थ उमरग्यात संतप्त शिवसैनिकांनी काढली रॅली

आ.ज्ञानराज चौगुलेंच्या निषेधार्थ उमरग्यात संतप्त शिवसैनिकांनी काढली रॅली

by राजकीय कट्टा
June 29, 2022
0

उमरगा-उमरगा तालुक्यातील संतप्त शिवसैनिकांनी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या निषेधार्थ मंगळवारी शहरातून रॅली काढली. या रॅलीचे नेतृत्व माजी तालुका प्रमुख सुरेश...

कन्हेरवाडी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार..

कन्हेरवाडी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार..

by राजकीय कट्टा
June 22, 2022
0

कळंब (राजकीय कट्टा प्रतिनिधी)भारतीय जनता पार्टी कन्हेरवाडी यांच्या तर्फे विद्या विकास हायस्कूल कन्हेरवाडी येथे गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सत्कार...

कळंब येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाच्या मंजूरीचा मार्ग सुकर-आ.कैलास पाटील

एकनाथ शिंदे यांच्या तावडीतून निसटला सेना आमदार, केला चिखलातून पायी प्रवास..

by राजकीय कट्टा
June 22, 2022
0

उस्मानाबाद : राज्यात सध्या राजकीय ड्रामा पहायला मिळत आहे. शिवसेना नेते तथा मंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या काही आमदारासह सुरत...

उस्मानाबादच्या माळरानावर फुलविली शिक्षणगंगा – डॉ.प्रतापसिंह पाटील वाढदिवस व्यक्तिविशेष

उस्मानाबादच्या माळरानावर फुलविली शिक्षणगंगा – डॉ.प्रतापसिंह पाटील वाढदिवस व्यक्तिविशेष

by राजकीय कट्टा
June 19, 2022
0

लेखक बालाजी भातलवंडे (जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी सोशल मीडिया उस्मानाबाद उस्मानाबाद (राजकीय कट्टा व्यक्तिविशेष ) खेड्यातून तालुक्याला गेलेल्या माणसाची झेप जिल्ह्याकडे असते....

युवक काँग्रेसच्या वतीने ईडीच्या कारवाई विरोधात मशाल पेटवून निषेध

युवक काँग्रेसच्या वतीने ईडीच्या कारवाई विरोधात मशाल पेटवून निषेध

by राजकीय कट्टा
June 19, 2022
0

भूम (राजकीय कट्टा प्रतिनिधी )गोलाई चौकात मशाल पेटवून निषेध व्यक्त करण्यात आला.शहरातील गोलाई चौकामध्ये विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने सोनिया गांधी...

एस.एम.पब्लिक स्कूलचा सलग ९व्या वर्षी १००% निकाल, विद्यार्थी व शिक्षक आवर होतय कौतुकानं वर्षाव

by राजकीय कट्टा
June 18, 2022
0

परंडा एसएम पब्लिक स्कुल या माध्यमिक विद्यालयातील इयत्ता १०वी मार्च/ एप्रिल २०२२परीक्षेचा निकाल सलग ९ व्यांदा १००%...

  • मुखपृष्ठ
  • राजकारण
  • जनरल
  • व्हीडीओ
  • आरोग्य
  • कृषी
  • देश विदेश
  • नौकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक

© 2021 DK Technos - Provides Technical Suppor Contact Us.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • आरोग्य
  • कृषी
  • जनरल
  • देश विदेश
  • नौकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • व्हीडीओ
  • शैक्षणिक

© 2021 DK Technos - Provides Technical Suppor Contact Us.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In