Sunday, July 3, 2022
  • Login
Rajkiyakatta
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • राजकारण
  • जनरल
  • व्हीडीओ
  • आरोग्य
  • कृषी
  • देश विदेश
  • नौकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • राजकारण
  • जनरल
  • व्हीडीओ
  • आरोग्य
  • कृषी
  • देश विदेश
  • नौकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Rajkiyakatta
No Result
View All Result

ज्यांच्या बुद्धीला जे वाटलं ते बोलले, अजित पवारांचा नारायण राणेंना टोला

राजकीय कट्टा by राजकीय कट्टा
November 27, 2021
in Uncategorized
0
ज्यांच्या बुद्धीला जे वाटलं ते बोलले, अजित पवारांचा नारायण राणेंना टोला
0
SHARES
284
VIEWS

पुणे | भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्यातील आघाडी सरकार मार्चमध्ये कोसळणार असल्याचा दावा केला आहे. राणेंच्या या दाव्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हवाच काढून घेतली आहे. त्यांच्या बुद्धीला जे वाटलं ते ते बोलले. आमचं सरकार चालणार आहे हे आमच्या अनेक नेत्यांनी स्पष्ट केलंच आहे, असा टोला अजित पवार यांनी लगावला.

अजित पवार यांनी पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांना नारायण राणे यांच्या दाव्याविषयी विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी हा दावा केला. ज्या दिवसापासून सरकार आलंय तेव्हापासून सरकार पडणार असल्याचं ऐकत आहे. पण सरकार चाललंय ना बाबा. कोण काय बोलतंय हे तुम्ही कोट करून सांगता. पण त्यांच्या सदसदविवेकबुद्धीला जे योग्य वाटतं ते ते बोलत आहेत. आमच्यातील अनेक मान्यवरांनी सरकार चाललं आहे. सरकारला काहीही धोका नाही हे आधीच स्पष्ट केलं आहे, असं पवार यांनी सांगितलं.

यावेळी त्यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. दोन ठिकाणी निवडणुका होत आहेत. त्याला आम्हीच जबाबदार आहोत का? सरकारच दुधखुळं आणि विरोधक काहीच करत नाही असं काही आहे का? टाळी एका हाताने वाजते का महाराज? दोन हात लागतात ना? बिनविरोध निवडणूक लढवण्याबाबत पहिलं स्टेटमेंट कुणी काढलं? विरोधकांनी काढलं. काही केलं तरी मुंबईत दोनच उमेदवार निवडून येणार होते. तिसरा फॉर्म आला. त्या उमेदवाराला लढण्यात काही अर्थ नसल्याचं वाटलं. त्याने माघार घेतली. कोल्हापुरात कितीही गप्पा मारल्या, कितीही आवाज काढले तरी सतेज पाटीलच निवडून येणार होते.

राष्ट्रवादीचे सर्वाधिक मते होती. काँग्रेसची त्याखालोखाल मते होती. तर धुळे-नंदूरबारमध्ये अमरीश पटेल कुठेही गेले तरी ते विजयी होतात. ते भाजपमध्ये गेले. त्यांच्याकडे संख्याबळ अधिक होते. त्यामुळे त्या ठिकाणी बिनविरोध निवडणूक झाली. अशा 6 पैकी 4 जागा बिनविरोध झाल्या. नागपूरमध्ये परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे तिथे निवडणूक होत आहे, असं त्यांनी सांगितलं.

Previous Post

‘कोरोनाचा नवीन व्हेरिएंट सर्वात घातक, राज्याला सावध व्हावं लागेल’

Next Post

म्हाडाच्या साडे चार हजार घरांसाठी फक्त दहा दिवसांत बारा हजारपेक्षा अधिक अर्ज

Next Post
म्हाडाच्या साडे चार हजार घरांसाठी फक्त दहा दिवसांत बारा हजारपेक्षा अधिक अर्ज

म्हाडाच्या साडे चार हजार घरांसाठी फक्त दहा दिवसांत बारा हजारपेक्षा अधिक अर्ज

ताज्या धडामोडी

अंबेहोळ येथे कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा

अंबेहोळ येथे कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा

by राजकीय कट्टा
July 2, 2022
0

उस्मानाबाद (राजकीय कट्टा प्रतिनिधी)राज्याचे माजी मुख्यमंत्री मा. डॉ. वसंतराव जी नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त 01 जुलै हा दिवस मौजे अंबेहोळ तालुका...

पीएसआयपदी निवड झाल्याबद्दल रणदिवे यांचा सारोळा येथे नागरी सत्कार

पीएसआयपदी निवड झाल्याबद्दल रणदिवे यांचा सारोळा येथे नागरी सत्कार

by राजकीय कट्टा
July 1, 2022
0

उस्मानाबाद : तालुक्यातील सारोळा (बुद्रुक) गावचे सुपुत्र प्रवीण उमाकांत रणदिवे यांचा पीएसआयपदी निवड झाल्याबद्दल नागरी सत्कार करण्यात आला. सारोळा येथे...

आ.ज्ञानराज चौगुलेंच्या निषेधार्थ उमरग्यात संतप्त शिवसैनिकांनी काढली रॅली

आ.ज्ञानराज चौगुलेंच्या निषेधार्थ उमरग्यात संतप्त शिवसैनिकांनी काढली रॅली

by राजकीय कट्टा
June 29, 2022
0

उमरगा-उमरगा तालुक्यातील संतप्त शिवसैनिकांनी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या निषेधार्थ मंगळवारी शहरातून रॅली काढली. या रॅलीचे नेतृत्व माजी तालुका प्रमुख सुरेश...

कन्हेरवाडी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार..

कन्हेरवाडी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार..

by राजकीय कट्टा
June 22, 2022
0

कळंब (राजकीय कट्टा प्रतिनिधी)भारतीय जनता पार्टी कन्हेरवाडी यांच्या तर्फे विद्या विकास हायस्कूल कन्हेरवाडी येथे गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सत्कार...

कळंब येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाच्या मंजूरीचा मार्ग सुकर-आ.कैलास पाटील

एकनाथ शिंदे यांच्या तावडीतून निसटला सेना आमदार, केला चिखलातून पायी प्रवास..

by राजकीय कट्टा
June 22, 2022
0

उस्मानाबाद : राज्यात सध्या राजकीय ड्रामा पहायला मिळत आहे. शिवसेना नेते तथा मंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या काही आमदारासह सुरत...

उस्मानाबादच्या माळरानावर फुलविली शिक्षणगंगा – डॉ.प्रतापसिंह पाटील वाढदिवस व्यक्तिविशेष

उस्मानाबादच्या माळरानावर फुलविली शिक्षणगंगा – डॉ.प्रतापसिंह पाटील वाढदिवस व्यक्तिविशेष

by राजकीय कट्टा
June 19, 2022
0

लेखक बालाजी भातलवंडे (जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी सोशल मीडिया उस्मानाबाद उस्मानाबाद (राजकीय कट्टा व्यक्तिविशेष ) खेड्यातून तालुक्याला गेलेल्या माणसाची झेप जिल्ह्याकडे असते....

  • मुखपृष्ठ
  • राजकारण
  • जनरल
  • व्हीडीओ
  • आरोग्य
  • कृषी
  • देश विदेश
  • नौकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक

© 2021 DK Technos - Provides Technical Suppor Contact Us.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • आरोग्य
  • कृषी
  • जनरल
  • देश विदेश
  • नौकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • व्हीडीओ
  • शैक्षणिक

© 2021 DK Technos - Provides Technical Suppor Contact Us.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In