Sunday, July 3, 2022
  • Login
Rajkiyakatta
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • राजकारण
  • जनरल
  • व्हीडीओ
  • आरोग्य
  • कृषी
  • देश विदेश
  • नौकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • राजकारण
  • जनरल
  • व्हीडीओ
  • आरोग्य
  • कृषी
  • देश विदेश
  • नौकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Rajkiyakatta
No Result
View All Result

मराठा आरक्षणाबाबत अजूनही सरकारची टाळाटाळ, भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांची टीका

राजकीय कट्टा by राजकीय कट्टा
May 9, 2021
in महाराष्ट्र
0
पुन्हा एकदा महिला अत्याचारांच्या मुद्द्यावरून चंद्रकांत पाटलांनी लगावला ठाकरे सरकारला टोला
0
SHARES
121
VIEWS


 
घटनेच्या १०२ व्या दुरुस्तीनंतरही राज्यांचा आपल्या राज्यातील एखाद्या जातीला आरक्षण देण्याचा अधिकार अबाधित आहे हे सर्वोच्च न्यायालयात सिद्ध करून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करावी. परंतु सरकार अजूनही त्या बाबत टाळाटाळ करत आहे, अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी केली.
 
मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, घटनेच्या १०२ व्या दुरुस्तीनंतर राज्यांना एखाद्या जातीला मागास आरक्षण देण्याचा अधिकार उरलेला नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयात तीन विरुद्ध दोन अशा न्यायमूर्तींच्या मतांनी देण्यात आला. परंतु, संसदेच्या संयुक्त चिकित्सा समितीचा अहवाल, केंद्रीय मंत्र्यांचे संसदेतील निवेदन आणि केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात मांडलेली भूमिका असा बराच पुरावा या दुरुस्तीबाबत उपलब्ध असून त्या आधारे राज्याला अजूनही मराठा जातीला आरक्षण देण्याचा अधिकार आहे, हे सिद्ध करता येईल. त्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी. परंतु सरकारने याबाबत अद्याप काही ठोस निर्णय घेतलेला नाही.
 
ते म्हणाले की, मराठा आरक्षणाबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या आजच्या बैठकीत काहीच ठोस निष्पन्न झाले नाही. राजर्षी शाहू शिष्यवृत्तीमार्फत निम्मी फी, वसतीगृहे, निर्वाहभत्ता, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या रोजगारासाठीच्या योजना, सारथी संस्था या माध्यमातून देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजाला ओबीसींप्रमाणेच सवलती उपलब्ध करून दिल्या होत्या. मंत्रिमंडळ उपसमिती सध्याच्या परिस्थितीत पुन्हा अशा प्रकारे मराठा समाजासाठी सोई सवलती सुरू करेल असे वाटले होते, पण प्रत्यक्षात त्यांनी तसा काही निर्णय घेतला नाही. मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका मुदतीत दाखल करण्याचा ठोस निर्णयही त्यांनी जाहीर केला नाही. ही टाळाटाळ चालू आहे. अशा रितीने वेळ गेला म्हणजे मराठा समाज शांत होईल, असे वाटत असेल तर चुकीचे आहे.
 
त्यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाचा सध्याचा निकाल आहे तसाच स्वीकारला तरीही मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य सरकारची जबाबदारी उरतेच. सर्वोच्च न्यायालयाने ज्या मुद्द्यांवर गायकवाड आयोगाचा अहवाल नाकारला आहे, त्या मुद्द्यांबाबत स्पष्ट उत्तर देणारा आणि मराठा समाज मागास आहे व त्याला अपवादात्मक स्थिती म्हणून पन्नास टक्क्यांच्यावर जाऊन आरक्षण देण्याची गरज सिद्ध करणारा अहवाल नव्याने तयार करावा लागेल. त्यासाठी सरकारला सर्वप्रथम राज्य मागासवर्ग आयोगाचे गठन करावे लागेल. गेली सुमारे दीड वर्षे हा आयोग राज्यात अस्तित्वात नाही. त्यानंतर तामिळनाडूप्रमाणे व्यापक सर्वेक्षण करून चांगला अहवाल तयार करावा लागेल व नंतर तो राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे पाठवावा लागेल. त्यानंतर तो राष्ट्रपतींकडे पाठवावा लागेल व नंतर त्यांच्या सूचनेनुसार मराठा आरक्षणाचा कायदा करावा लागेल. केवळ केंद्र सरकारकडे चेंडू ढकलण्याचा प्रयत्न करून काही साध्य होणार नाही.

Previous Post

मग योग्य कोण ? तुम्ही की मोदी, जयंत पाटलांचा फडणवीसांना सवाल !

Next Post

चिंचपूर ढगे येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर किर्तेश्वर प्रतिष्ठानच्यावतीने सॕनिटायझरने फवारणी

Next Post

चिंचपूर ढगे येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर किर्तेश्वर प्रतिष्ठानच्यावतीने सॕनिटायझरने फवारणी

ताज्या धडामोडी

अंबेहोळ येथे कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा

अंबेहोळ येथे कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा

by राजकीय कट्टा
July 2, 2022
0

उस्मानाबाद (राजकीय कट्टा प्रतिनिधी)राज्याचे माजी मुख्यमंत्री मा. डॉ. वसंतराव जी नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त 01 जुलै हा दिवस मौजे अंबेहोळ तालुका...

पीएसआयपदी निवड झाल्याबद्दल रणदिवे यांचा सारोळा येथे नागरी सत्कार

पीएसआयपदी निवड झाल्याबद्दल रणदिवे यांचा सारोळा येथे नागरी सत्कार

by राजकीय कट्टा
July 1, 2022
0

उस्मानाबाद : तालुक्यातील सारोळा (बुद्रुक) गावचे सुपुत्र प्रवीण उमाकांत रणदिवे यांचा पीएसआयपदी निवड झाल्याबद्दल नागरी सत्कार करण्यात आला. सारोळा येथे...

आ.ज्ञानराज चौगुलेंच्या निषेधार्थ उमरग्यात संतप्त शिवसैनिकांनी काढली रॅली

आ.ज्ञानराज चौगुलेंच्या निषेधार्थ उमरग्यात संतप्त शिवसैनिकांनी काढली रॅली

by राजकीय कट्टा
June 29, 2022
0

उमरगा-उमरगा तालुक्यातील संतप्त शिवसैनिकांनी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या निषेधार्थ मंगळवारी शहरातून रॅली काढली. या रॅलीचे नेतृत्व माजी तालुका प्रमुख सुरेश...

कन्हेरवाडी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार..

कन्हेरवाडी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार..

by राजकीय कट्टा
June 22, 2022
0

कळंब (राजकीय कट्टा प्रतिनिधी)भारतीय जनता पार्टी कन्हेरवाडी यांच्या तर्फे विद्या विकास हायस्कूल कन्हेरवाडी येथे गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सत्कार...

कळंब येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाच्या मंजूरीचा मार्ग सुकर-आ.कैलास पाटील

एकनाथ शिंदे यांच्या तावडीतून निसटला सेना आमदार, केला चिखलातून पायी प्रवास..

by राजकीय कट्टा
June 22, 2022
0

उस्मानाबाद : राज्यात सध्या राजकीय ड्रामा पहायला मिळत आहे. शिवसेना नेते तथा मंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या काही आमदारासह सुरत...

उस्मानाबादच्या माळरानावर फुलविली शिक्षणगंगा – डॉ.प्रतापसिंह पाटील वाढदिवस व्यक्तिविशेष

उस्मानाबादच्या माळरानावर फुलविली शिक्षणगंगा – डॉ.प्रतापसिंह पाटील वाढदिवस व्यक्तिविशेष

by राजकीय कट्टा
June 19, 2022
0

लेखक बालाजी भातलवंडे (जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी सोशल मीडिया उस्मानाबाद उस्मानाबाद (राजकीय कट्टा व्यक्तिविशेष ) खेड्यातून तालुक्याला गेलेल्या माणसाची झेप जिल्ह्याकडे असते....

  • मुखपृष्ठ
  • राजकारण
  • जनरल
  • व्हीडीओ
  • आरोग्य
  • कृषी
  • देश विदेश
  • नौकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक

© 2021 DK Technos - Provides Technical Suppor Contact Us.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • आरोग्य
  • कृषी
  • जनरल
  • देश विदेश
  • नौकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • व्हीडीओ
  • शैक्षणिक

© 2021 DK Technos - Provides Technical Suppor Contact Us.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In