उस्मानाबाद (प्रतिनिधी)आज स्पर्धेचे युग आहे स्पर्धेच्या युगामध्ये टिकायचे असेल तर मुलींनी प्रत्येक गोष्टीला आत्मविश्वासाने सामोरे गेले पाहिजे असे प्रतिपादन अध्यापक महाविद्यालयाच्या प्रा. सुकेशनी गव्हाणे-मातने यांनी व्ही.पी.कॅम्पस आळणी येथील श्री.भैरवनाथ निसर्ग मंडळ संचलित औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयात जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमांमध्ये केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.कैलास मोटे हे होते.
प्रमुख पाहुण्या म्हणून अध्यापक महाविद्यालयाच्या प्रा.श्रीमती सूकेशनी गव्हाणे-मातने या होत्या तर व्यासपीठावर फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य सुरज ननवरे, कॉलेजच्या प्राध्यापिका श्रीमती उंबरे ए.बी.व केदार सर हे उपस्थित होते.
महिला दिनानिमित्त व्ही.पी.कॅम्पसमधील अध्यापक महाविद्यालय,पॉलिटेक्निक कॉलेज, कृषी महाविद्यालय,आर.पी.कॉलेज ऑफ फार्मसी तसेच एस.बी.एन.एम.औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयातील सर्व महिला कर्मचाऱ्यांचा सन्मानचिन्ह भारतीय संविधान प्रत व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
पुढे बोलताना प्रा.सुकेशनी गव्हाणे-मातने यांनी स्त्री पुरुष तुलना न करता स्त्रियांनी भारतीय संस्कृतीचे जतन केले पाहिजे.ज्या नवीन योग्य गोष्टी आहेत त्यादेखील स्वीकारल्या पाहिजेत असे सांगितले.आज स्त्रिया कोणत्याही क्षेत्रात कमी नसल्या तरी देखील त्यांना ‘चूल आणि मूल’ या गोष्टी आजही चुकलेल्या नाहीत आणि भविष्यातही त्या चूकतील असं वाटत नाही हे सांभाळूनच आपल्याला इतर कामे करावी लागतील याची मानसिकता मुलींनी करून घेणे आवश्यक आहे.स्त्रियांना आयुष्यात सर्व भूमिका सुरळीत पार पाडाव्या लागतात आणि त्या पाडल्यानंतरच घरात व समाजात त्यांना मान राहतो असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण करताना प्राचार्य कैलास मोटे यांनीही स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवावा असे आवाहन केले.यावेळी श्रीमती उंबरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस.बी.एन.एम. महाविद्यालयाचे प्राचार्य सुरज नन्नवरे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. अक्षता खडके व कु.थोडसरे सृष्टी यांनी केले व आभार प्रा.नागरगोजे आर.बी.यांनी मानले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थी इतर कर्मचाऱ्यांनीही परिश्रम घेतले.