
उस्मानाबाद( राजकीय कट्टा प्रतिनिधी) कदमवाडी ता.तुळजापुर येथील वारकरी हे पंढरपुर येथे ट्रॅक्टरने प्रवास करुन दर्शनासाठी जात होते. वाटेत जाताना त्यांच्या वाहनाचा अपघात होऊन चार वारकऱ्यांचा मृत्यु झाला आहे. त्यामध्ये १९ वारकरी हे गंभीर जखमी झाले असुन त्यापैकी चार वारकरी हे अतिगंभीर असुन त्यांची परिस्थिती नाजूक आहे. त्यांना उपचाराचा खर्च देखील पेलवण्याची आर्थिक स्थिती नाही, शिवाय जे मयत झालेले आहेत. त्याच्या कुटुंबावर मोठा आघात झाला असुन त्यांना सावरण्यासाठी शासन म्हणुन आपण मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत या वारकऱ्यांना व मयत झालेल्या वारकऱ्यांच्या नातलगांना भरीव आर्थिक सहाय्य करुन सहकार्य करावे अशी विनंती मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे साहेब यांची कळंब उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील व आ. ज्ञानराज चौगुले यांच्यासह भेट घेऊन केली आहे. याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब सकारात्मक असून मदतीचे आश्वासन दिले आहे.